कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचे ताशेरे भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहेत. कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीत अनेक त्रुटी असल्याचे ताशेरे भारताचे नियंत्रण आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात ओढण्यात आले आहेत. पाणीपट्टी, टॅक्स आणि नगररचना विभाग या खात्यांत अनेक दोष आढळून आले असून, संगणक प्रणालीतून डिलिट केलेल्या कोटय़वधींच्या रकमेचा पुरावाच नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून, हा अपहार असल्याचेही अहवालात म्हटले आहे. जवळपास 100 कोटी रुपयांचा तात्पुरता अपहार झाल्याने खळबळ उडाली आहे.
|कल्याण-डोंबिवली महापालिकेने 1999 मध्ये सुरू केलेल्या ई-गव्हर्नन्स योजनेचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाल्यानंतर राज्यातील अन्य पालिकांनी त्याचे अनुकरण केले. मात्र, या योजनेत काही त्रुटी असल्याचे कॅगला आढळले आहे. केडीएमसीच्या लेखापरीक्षणाचा कॅगचा अहवाल विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठेवण्यात आला होता. यात पाणीपट्टी बिलात व मालमत्ता कराच्या बिलात दोष असून, पाणी बिलाची 23 हजार 908 प्रकरणांतील सुमारे 21 कोटी रुपयांची बिले डिलिट करण्यात आलेली आहेत. Read more....
Source: http://www.prahaar.in/mumbai/54126.html



